आज खूप दिवसान काही लिहावास वाटल. वाटल आपला मत मांडव म्हणून लिहितो थोडस.आज आपण थोड आपले आरोग्या बद्दल बोलू आपल आरोग्य हा मोठा यक्ष प्रश्न बनून आपल्या समोर उभा आहे,आपले चुकीच्या खाण्याच्या सवई व चुकीच्या जीवनपद्धतीमुळे.आजकाल आपण जेवतो ते वेळ झाली म्हणून ,फार कमी जण भूक लागल्या मुळे जेवतात व त्या जेवणात आपल्याला किती जीवनसत्वे प्रथिने मिळतात हे तपासणे तर दूरची गोष्ट.चांगल जेवण याची व्याख्या आपल्या लेखी चमचमीत ,लज्जतदार आशीच आहे. त्यातून आपल्याला आपल्या अनमोल शरीरासाठी काही मिळते का हे पाहणेही आपल्याला जमत नाही किबहुना तेवढा वेळ आपल्याला नसतो.आपल्याला हवे असणारे जीवनसत्वे प्रथिने आपल्याला मिळत नाहीत तर नको असणारी कार्बोहाइड्रेट फॅटस् आपल्याला जास्त मिळतात.यासाठी आपली जीवनशैली बदलण्याची गरज भासते.जास्त पिष्टमय पदार्थाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते व हे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आपले शरीर इन्शुलीन तयार करते व हे इन्शुलीन आपले शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते व जास्त झालेल्या साखरेचे चरबीत रुपांतर करते व अशा प्रकारे रोज क्रिया होवून आपले चरबीचे प्रमाण वाढते व आपले शरीर लठ्ठपणा कडे झुकते. या पुढच्या लेखात आपण या चरबीमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयी चर्चा करू.
क्रमशः